कोलकात्याने पंजाबचा २८ धावांनी पराभव केला व त्याचबरोबर क्रमांक १च स्थानही काबीज केलं.पुन्हा एकदा त्यांच्या विजयाचा नायक ठरला आंद्रे रसेल.
रसेलने ताबडतोब १७ चेंडूत ४८ धावांची खेळी केली.त्याचबरोबर नितिश राणाच्या ६३ तर राॅबीन उथप्पाच्या ६७ धावांच्या जोरावर कोलकात्याने पंजाबसमोर २१८ धावांचे आव्हान ठेवले.
मिलर व मयंक अग्रवाल इनिंग सावरण्याचा प्रयत्न केला पण तो अपुरा ठरला व २० षटकात १९०/४ पर्यंतच मजल मारता आली.
Advertisement
अश्र्विनची चूक पडली महागात
मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर बाद झाला मात्र नियमानुसार पावरप्लेत ३० यार्ड सर्कल च्या आत ३ खेळाडू असल्याने तो नोबाॅल ठरवण्यात आला तेव्हा तो फक्त ३ धावांवर खेळत होता आणि जिवनदानानंतर त्याने ११ चेंडूत ४५ धावा केल्या व विजयात मोलाच योगदान दिलं.
अश्विनला कर्णधारपदाचा कमी असलेला अनुभव फार महागात पडला.